इतिहास
प्रश्न एक) खालील रिकाम्या जागी योग्य शब्द भरा रा
1) शिलालेख हा इतिहास लेखनाचा फार महत्त्वाचा आणि विश्वसनीय पुरावा मानला जातो,
2)उदयसिंह यांच्या मृत्यूनंतर महाराणा प्रताप हा मेवाडच्या गादीवर आला
3) नायनार हे शिवभक्त होते
4) पुरंदरच्या तहानंतर जयसिंगाने आदिलशाही विरुद्ध मोहिम हाती घेतली
प्रश्न दोन) गटात न बसणारा शब्द शोधा
1) पुणे, सुपे, चाकण, बंगळूर
उत्तर: बंगळूर
2) शहाजी, संभाजी , तानाजी, व्यंकोजी
उत्तर: तानाजी
3)ओव्या, तवारीख, कहाण्या, मिथके
उत्तर: तवारीख
प्रश्न तीन) खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा
1) शिवाजी महाराजांच्या आरमाराचे प्रमुख अधिकारी कोण होते?
उत्तर: शिवाजी महाराजांच्या आरमाराचे प्रमुख अधिकारी मायनाक भंडारी व दौलत खान होते
2) पुरंदरचा त ह कोण कोणाचा झाला?
उत्तर: पुरंदरचा तह शिवाजी महाराज व जयसिंग यांच्या झाला.
3) कोणतेही चार स्त्री संतांची नावे लिहा
1) संत मीराबाई
2) संत मुक्ताबाई
3) संत जनाबाई
4) संत कान्होपात्रा
प्रश्न 4 कारणे लिहा
1)शिवाजी महाराजांनी मोगलांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला
उत्तर: मुगल सैन्याने स्वराज्यातील भूप्रदेशाची मोठी हानी केली होती तसेच पुरंदरच्या तहात मोगलांना दिलेले किल्ले आणि प्रदेश परत मिळवण्यासाठी शिवाजी महाराजांनी मुघलांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतली
2) महाराणा प्रताप इतिहासात अजरामर झाले
उत्तर: मेवाडच्या अस्तित्वासाठी महाराणा प्रताप मुघलांनबरोबर संघर्ष चालू ठेवला आणि त्यांनी स्वातंत्र्य टिकवण्यासाठी अकबरा बरोबर संघर्ष केला पराक्रम,, शौर्य, त्याग इतिहासातील गुणांमुळे ते इतिहास आज रामर झाले
भूगोल
प्रश्न एक) पृथ्वी गोलाची निरीक्षण करू पुढील विधाने योग्य विधाने दुरुस्त करा आणि पुन्हा लिहा.
1) रेखावृत्त एकमेकांना समांतर असतात
उत्तर :अयोग्य विधान
रेखावृत्त एकमेकांना समांतर नसतात
2 )मुळ रेखावृत्त हे अक्षवृत्त ला समांतर असते
उत्तर: अयोग्य विधान
मुळ रेखावृत्त हे अक्षवृत्त ला समांतर नसते
प्रश्न 2) योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा
1) हवा प्रसरण पावली ________
उत्तर हवा प्रसरण पावली की विरळ होते
2 )पृथ्वीवर हवेचा दाब---------
उत्तर पृथ्वीवर हवेचा दाब असमान असतो
प्रश्न 3) भौगोलिक कारण लिहा
1) सह्याद्री या पश्चिम भागात बेसाल्ट खडकापासून जांभा मृदा तयार होतो
उत्तर सह्याद्रीच्या पश्चिम भागात हवामान दमट असते तसेच तेथे अतिवृष्टी होते पैसा खडकाची विदारण मोठ्या प्रमाणात होते अति पावसाच्या प्रदेशात खडकाचे झालेले विदारण मोठ्या प्रमाणात वाहून जातो मूळ खडक उघडा पडतो खडकातील लोहाचे वातावरण प्राणवायूशी संयोग होऊन रासायनिक क्रिया घडते जांभी मृदा तयार होते व त्यामुळे तिला जांभळा रंग प्राप्त होतो
No comments:
Post a Comment